1. शासन निर्णय: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई दि. 30/01/2014.
बालहक्क (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2000 व सुधारीत नियम 2006 अन्वये अनाथ मतिमंद बालकांसाठी एकुण 19 विशेष बालगृहे स्वयंसेवी संस्थाकडून चालवली जात असून राज्यातील
13 जिल्हामध्ये ही बालगृहे कार्यरत आहे.
1. विहीत नमुन्यात बाल कल्याण समिती यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
2. अर्जदाराचे अपंगत्व किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे व तो अनाथ असावा.
3. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा,
या बालगृहामध्ये प्रवेशिांना अपंगाच्या विशेष शाळा / कर्मशाळा तसेच वसतिगृहांना असलेल्या निकषानुसारच देखभाल व निर्वाहासाठी अनुदान देण्यात
येत असून शैक्षणिक, आरोग्यविषयक सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.